दुरून डोंगर साजरे ..
दोन शाळेतले अनुभव शब्दांतुन मांडण्याचा प्रयत्न!
सकाळ व्हायची. शाळेची घंटा वाजण्या आधी शाळेत पोहचलोच पाहिजे हा
प्रत्येक विद्यार्थ्यांचा अट्टहास. तरी काही जण आमच्या सारखी मैत्रीण सोबत हवीच म्हणून लवकर उठून ही शाळेत जायला मैत्रिणी सोबत पळत पळत शाळा गाठायची कमीत कमी वेळात म्हणजे १५ मिनिटे शाळा दूर असेल तर १०मिनिटात पोहोचणे नित्यनेमाचे झाले.
ह्या वर्गाची वेगळी गोष्ट म्हणजे . ह्या वर्गात मूल आणि मुली असा भेदभाव केला जायचा. शाळा इथे कमी पडली हा संस्कार देण्यात!
दोन्ही शाळेतला हा मूळ फरक मुक्ता ला जाणवला.
कधी ती किंवा इतर कोणी मुली मुलांसोबत बोलल्या किंवा शाळेच्या बाहेरच्या क्लास मध्ये परीक्षा पेपर द्यायच्या दिवशी बाजूला बसल्या तरी मुली काही चिडवायला सुरवात करायच्या!
एकदा मुक्ता आणि तिची वर्गातली एक मुलगी पकडा पकडी नेहमी सारखं खेळायच्या . त्या मुली कळ काढायच्या आणि ती एकटी रोज अंगात मस्ती म्हणून मज्जा करायला जायची! त्या निमित्ताने खेळणं ही व्हायचं असं नकारात्मक ते कडून सकारात्मक विचार करणे तिने सुरू केले!आणि काही करून आई साठी जीची तब्बेत ठीक नव्हती तिच्या साठी खूप खूप शिकायचं हा एक च ध्यास मनात होता.
घरच्या आरोग्य निगडित तक्रारी मुळे तिला कमीत कमी एक मित्र हवा होता.पण ह्या दुसऱ्या शाळेत तिची गरज मानसिक गरज नाही पूर्ण झाली.
मग तिने वर्गातल्या सर्वांना च मित्र मैत्रिणी आहेत असं काल्पनिक जीवन जगायला सुरवात केली ! त्यात एक जण तिला मित्र म्हणून हवा होता! मग केली तिने काल्पनिक मैत्री! तितकाच तिला मानसिक आधार!
आता शाळा संपल्यावर हे मित्र ओर्कुट, फेसबुक वर भेटले आणि तिला कळलंच नाही यांच्या सोबत कसं बोलायच सहजपणे ; पण ती नियमित पणे
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायची इतरांना देते तशी!
Career ह्या एका विषयावर चर्चा व्हायची! तिला नंतर आई नसल्यामुळे
कॉलेज संपल्यावर
तिला नंतर आई नसल्यामुळे
घरची जबाबदारी तिच्यावर आली होती. म्हणून प्रोत्साहन मिळावे म्हणून आपल्या वर्गमित्र, वर्ग मैत्रिणी काय करतात ह्यात तिला रस होता!
म्हणजे मानसिक त्रासा मुळे तिची प्रगती नको थांबायला.
तिला मुलींनी त्रास दिला तरी शाळेतल्या वर्ग शिक्षक मुक्ता ला च ओरडायचे.
एकदा वडीलां सोबत शाळेबाहेर मुक्ता वर्ग शिक्षकांना भेटली तर वर्ग शिक्षकांनी तिची तक्रार केली.
पण वडील समजूतदार होते प्रेमळ आहेत पण मनासारखं घडलं नाही की कठोर वागतात. तर ती अभ्यास करायची बरोबर म्हणून तिला काही बोललेच नाही.
एकदा गुरुपौर्णिमा का शिक्षक दिनी वक्तृत्व करायचं गुरू वर अशी शिक्षा मिळाली😂😀
मी बाबा सरांना घाबरून सगळं पाठ करून आले.
तेव्हा काय गुगल नव्हतं ना कॉम्प्युटर.
फक्त वर्ग हेच आपलं विश्व मुक्ता ने स्वीकारलं होत!
तीन वर्षे शाळेचा कालावधी होता!
कोणी आदर्श बालवाडी चा फोटो आणून दाखवायचं आणि ही तूच का
अस कुत्सित पणे विचारलं जायचं!
एक वर्गातली मुलगी खेळ खेळायची. तर ती बोलते कशी तुझं राहणीमान काय साधं सरळ. तू अशीच राहणार!
हीच मुलगी १० वी चा निकाल लागल्यावर आई आणि मुक्ता बसल्या होत्या तिथे मुक्ता च्या बाजूला येऊन कुत्सित मनोवृत्ती ने विचारते किती मिळाले म्हटलं निकाल पत्रकच बोलकं आहे.चपराक च दिली तिच्या गालावर .
शाळेतला पहिला महिना
आधी त्या दुसऱ्या शाळेतल्या वर्गातल्या मुलींनी त्रास काय कमी दिला
म्हणून आगीत तेल ओतायला आले शिक्षक!
एक मराठी आणि दुसरे इंग्रजी चे शिक्षक.
इंग्रजी चे शिक्षक का सोडली शाळा असे अनेक प्रश्न
विचारून तिला रडवल!😔😔
ते ही पूर्ण वर्गा समोर!
नंतर मराठी च्या बाई आल्या बोलत होत्या हस्ताक्षर सुधार तुझं! एकदा ठीक आहे अनेकदा!
मग काय मानसिक त्रास इतका दिला तर माझा
अभ्यास कसा होणार
म्हणून तिने सरळ मुख्याध्यापिकेला पत्र लिहिलं!
पत्र देताना वाटेत मराठी च्या बाई भेटल्या
फेविकोल लावलं म्हणून त्यांना काही कळलं नाही पत्रात काय लिहिलं आहे ते!
मुक्ता ने त्यात अनुभव लिहिले होते.
मार्गदर्शन पुस्तकातून
सरळ सरळ कॉपी पेस्ट सुरू आहे.
कसलं ज्ञान मिळत यातून!
तर मुख्याध्यापिका बाई म्हणाल्या असू दे
हस्ताक्षर सुधारते.
मुख्याध्यापिकेला!
आता आई भावाला शाळेत सोडायला जायची.
रोज दिसायची म्हणून मुख्याध्यापिका बाई वर च्या वर बोलायच्या
तर आता नवीन अफवा मुक्ता ची आई मुख्याध्यापिकेची मैत्रीण!
पत्र आणि ह्या गोष्टी चा काडीचा संबंध नव्हता तरी मुलींना
अभ्यास सोडून मला त्रास देण्यात जास्त रस!
पहिल्या शाळेत
मैत्रीपूर्ण वातावरण होतं.
पालक,शिक्षक , मूल ,मुली एकमेकां सोबत सहज बोलायची!
ही गोष्ट काही तिला पहिल्या शाळेत गवसली नाही म्हणून तिला शाळा सोडून २० वर्षे झाली तरी त्या वाईट आठवणीपासून सूटका नव्हती!
म्हणून तिने संवाद करण्यासाठी फक्त पाच जण दोन्ही शाळेतली मूले,मुली निवडली!
तिला कळलं सगळे इतके matured नाहीत किंवा त्यांना आता सांगून उपयोग काही नाही!
सगळं निरर्थक!
दुसऱ्या शाळेत एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे खूप सारी झाडे.
एकदा झाडे लावा झाडे जगवा म्हणून एका जवळच्या जंगलात गेलो होतो.
एक दिवशी आर्मी चे साहसी खेळ बघायला गेलो होतो!
फक्त आमचा वर्ग !
शाळेतल्या मुलीं ची राजनीती
ज्या मुक्ता ला मानसिक त्रास द्यायच्या
त्यांनी मुक्ताला ना नृत्य कले मध्ये भाग घ्यायला दिला ना कधी खो खो कब्ब डी खेळात भाग घ्यायला दिला!
नृत्य कले च सादरीकरण मात्र झालच नाही!
अश्या प्रकारे मुक्ता राजकारण शिकली .
समाजा सा ठी जे योग्य त्या राजकारणाला तिचं समर्थन आहे! देश हित करणाऱ्या संस्थेला समर्थन !
एकदा वर्गात शांत न बसणाऱ्या मुलांची तक्रार केली. मन शांती हवी होती मला! एक तर घरी आई आजारी म्हणून !
तर त्या वर्गातल्या मुलांनी
आजच्या भाषेत trolling केलं शाळे बाहेरील क्लास ध्ये!
पण तिने मोजून एक दोन शब्द ऐकले होते.
आता मनस्थिती ठीक नसल्या वर..
ती आता अस्वस्थता , मनातली खदखद
ऐकायला
व्यक्त व्हायला दोन शाळेतल्या अनुभव आणि समस्येवर पुस्तक काढण्याचा प्रयत्न केला आहे!
तेव्हा तिला कळलं प्रत्येक माणसांच्या वेगवेगळ्या समस्या असू शकतात.
व्यक्तिमत्त्व
तस शाळेच ही आहे.
दासबोध , मनाचे श्लोक वाचन मध्ये सुरु
ठेवलं होतं
आता व्यक्त ही झाले आणि मन मोकळं झालं आहे. पुस्तक लिहून!
पुन्हा कोणावर असा प्रसंग येऊ नये म्हणून पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे!।
आता सोबत काही सुविचार आणि कायदेशीर कारवाई चे ज्ञान school ragging वर देण्यात येईल!
धन्यवाद ज्या वर्ग मित्र मैत्रिणी यांनी
मदत केली मुक्ता ला मानसिक आधार दिला
त्याच्या मुळे आज पुस्तक लिहून पूर्ण होत आहे!।
गणपती बाप्पा मोरया! 🙏